Latest Posts

मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

– मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात

– २ दिवस आधी अर्ज सादर करावा.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्व प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती एम.सी.एम.सी. स्थापन करण्यात आली आहे.

मतदानापुर्वीचा एक दिवस २५ एप्रिल आणि मतदानाच्या दिवशी २६ एप्रिल मुद्रित माध्यमाद्वारे प्रिंट मिडीया प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २६ एप्रिल २०२४ रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट मीडियातून कोणत्याही प्रक्षोभक दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा निर्माण होईल. अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये. याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

प्रचार साहित्याचा मजकूर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कडून तपासणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष उमेदवार किंवा प्रतिनिधींनी किमान जाहिरात प्रसारित होण्याच्या दोन दिवस पुर्वी प्रमाणीकरणासाठी अर्ज सादर करावा. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती एमसीएमसी समितीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासात निकाली काढणे बंधणकारक आहे.

कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात जोपर्यंत राज्य / जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून एमसीएमसी पूर्व प्रमाणीत केली जात नाही. तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यायची झाल्यास अर्जदारांना सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी त्यांच्या ५ एप्रिल २०२४ च्या पत्रान्वये कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss